![]() |
Sugar Production |
Sugar Production : साखर कारखान्यांवर यंदाचा गाळप हंगाम मार्चमध्येच आटोपता घेण्याची वेळ ओढवली आहे. शेतकऱ्यांना उसाला एकरी केवळ 28 टन उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी आणि कारखानदार दोघेही यंदा तोट्यात गेले आहेत.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिल अखेर चालेल, असा अंदाज प्रारंभी व्यक्त केला गेला. त्यादृष्टीने कारखान्यांनी तयारीही केली होती. 150 ते 180 दिवसांचा गाळप हंगाम हा कारखानदारीच्या अर्थकारणासाठी चांगला मानला जातो. मात्र चालू हंगाम 150 दिवसांच्या आत आटोपण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख कारखान्यांची अशीच स्थिती आहे.
Sugar Production
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात अवघे एक कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून 97 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात जिल्ह्यात एक कोटी 85 लाख मेट्रिक टनाहून जास्त उसाचे गाळप झाले होते. साखरेचे उत्पादन तब्बल दोन कोटी क्विंटल साखरेवर गेले होते. यंदा मुबलक ऊस असला तरी वजनात 50 टक्के घट झाल्याने कारखान्यांचे अंदाज चुकले आहेत.
एकरी २८ टन उत्पादन
- अशोक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गाळपासाठी यंदा 9 हजार 746 हेक्टर ऊस उपलब्ध होता.
- कार्यक्षेत्राबाहेरील 549 हेक्टर ऊस क्षेत्राची कारखान्याकडे नोंद करण्यात आलेली होती.
- त्यामुळे अशोकने 8 लाख 70 हजार टनाच्या गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केलेले होते. त्यादृष्टीने सर्व नियोजनही पार पडले.
- मात्र असे असले तरी प्रत्यक्षात गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर उद्दिष्ट खाली आले. मार्चच्या पहिल्या किवा दुसया आठवड्यामध्ये अशोकचे घुराडे बंद होणार आहे.
- 150 दिवसांचा हंगामही कारखाना पूर्ण करू शकणार नाही. अशोकच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाची घटलेली सरासरी उत्पादकता हे त्यामागे प्रमुख कारण ठरले आहे. अवघे 5 लाख 65 हजार टनाचे गाळप यंदा होईल, अशी माहिती ऊस विकास विभागाकडून मिळाली.
No comments:
Post a Comment
मी आपली काय मदत करू शकतो ?